Thursday, December 15, 2011

क्यों रुके ?


फासले जो बीच हमारे, अँधेरे की तरह छाये
तो खामोश खामोश चेहेरेपे रात क्यों रुके ?

तेरे कदमोंके निशाँ राहोंमे सरे बिखरेसे,
मै धुंडने चला हूँ , तो बरसात क्यों रुके ?

धन-औ-सत्ताका 'शरीफोंका' जुलूस है,
ईमान पूछूँ जरासा, तो बात क्यों रुके ? 

यह बेरहम समय तो निकल रहा 'गौरव'
आँखोंमे सुहानी यादोंकी बारात क्यों रुके ?
----------------------------------- 

Wednesday, October 19, 2011

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी,  
डोळ्यांत पाणी,
सारे काही ठरलेले,
अजून उरी जपले आहे 
तुला कधी न कळलेले..

तुझ्या माझ्या भावलहरींचा 
जरा कुठे बसता मेळ,
शब्द सारे हरवून जाती 
विरहाची ये अवचित वेळ
  मध्यरात्रीच्या दीर्घ स्वगतांत
  स्मरणाचे ऋतू सरलेले 

  तुझ्या आठवणी 
  डोळ्यांत पाणी 
  सारे काही ठरलेले...

Sunday, August 21, 2011

क्रांति का आग़ाज


इक पलकी न इक दिनकी 
यह बरसोंकी बात है,
आजादिकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है |

पैसोंकी सब नशा है 
और सत्ताका  गुमान है ,
गम कहाँ,शर्म कहाँ ?
इनका बिक चुका ईमान है,
  बदलाव के अब बादल है,
  अरमानोंकी बरसात है ||
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..

सच्चाई की कीमत कहाँ ?
बेईमानीका चलता राज,
नौजवान अब जाग उठे 
परिवर्तन का हो आग़ाज ,
  खुशहाली की सहर हो रही,
  ढलनेको काली रात है ||     
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..

कठिनाईसे झुंज लेंगे 
निर्भयता का हाथ मिले,
लोकतंत्रके दहलीज पर 
नीतीमूल्योंके चराग़ जले,
  अब तो आँधी आनी है,
  पूरा भारत साथ है ||
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..
                           - गौरव पांडे 

Saturday, July 16, 2011

भेट

आपलं ते अवचित भेटण
ते डोळ्यांत पाहण
जुने नवे संदर्भ शोधण
अनोळखी रस्त्यावरून चालत जाण

अनोळखी दिशा
अनोळखी वळणे 
परी तुझ्या सोबतीचा 
उघडोनी नकाशा 
दिशा झाली रोजची 
मार्ग पायांखालचा

विरहाचे दुख: सारे 
सांगून हलके झाले
वाहत्या वाऱ्यासंगे
क्षण आनंदाचे आले

उगाच आपण नंतर 
बोलत राहिलो काही
समयाचा सूर्य तिथे 
वेगे बुडून जाई

हळव्या मोहक क्षणी 
हातात गुंतले हात 
स्तब्ध सारे स्थलकाळ 
स्तब्ध चंद्र आकाशात 

जे बोललोच नाही
त्याचा अर्थ कैसा लागला  
परतीच्या वाटेवर 
प्राजक्त गंधाळला. 
               -  गौरव 

Monday, June 13, 2011

विरह



आहेत तशाच अपुल्या
जन्मोजन्मीच्या गाठी, 
ही वणवण, या वेदना 
साऱ्या तुझ्याचसाठी. 

विरहाची रात्र अटळ
संपत नाही अजुनी ,
मी शोधितो पुन्हा पुन्हा
तुलाच ग तुलाच फिरुनी !



(ही कविता ३ वर्षांपूर्वी लिहिलेली आणि गहाळ झालेली )

Sunday, May 1, 2011

इंसान और ईश्वर

इंसान सदियोंसे सर्वश्रेष्ठ प्रेरणा को ढूंढ़ता आया है ,
कोई मंदिरमें, कोई मस्जिदमें, कोई चर्चमें 
बस महसूस करते है लोग ,
किसीने देखा नहीं !
सब किसी चमत्कारितामें ढूंढते रहते है 
विधाता का अस्तित्व..
मै नादाँ सोचता रहता हूँ के, 
रास्ते के किसी कोने में बैठा एक लावारिस बच्चा,
जिसे दो दिन से खाना नसीब न हुआ हो..
अगर आप उसकी रो रो के नम हुई आँखोंमे
राम-रहीमको नहीं देख सकते तो
काशी-मक्का जानेका क्या मतलब ? 
                                              -  गौरव 

Wednesday, April 13, 2011

संभ्रम

स्वप्न सत्याच्या संघर्षात 
माझे पाऊल कुठले ?
सत्य स्वप्न,स्वप्न सत्य 
साधे गणित चुकले 

हरवून गेल्या दिशा दहा 
हरवून गेले सूर 
सत्य मिथ्या,दंश वृथा 
स्वप्न राहिले दूर 

व्यक्त-अव्यक्ताचा अर्थ निरर्थक
निरार्थाकाचाच खेळ सारा 
खिन्न मन उदास क्षण 
पश्चात उरे पसारा 

घट्ट नाती खोल वेदना 
सुखदुःखाचे अवघे विभ्रम 
विरली वाट उरले केवळ 
पाऊल...काटे...संभ्रम...

Friday, April 1, 2011

खेळ

सुखदु:खे अन हास्यअश्रू    
अव्यक्तातून शाश्वत ज्ञान,
जीवनखेळ हा अद्भुत नश्वर
नसे हारजीत नुरे अवधान
 

Friday, March 11, 2011

पाऊस

पाऊस झाला हिरवा
हिरव्यागार पानांचा
थेंबांतून उलगडे 
खेळ नव्या क्षणांचा 

पाऊस आला दाटून 
मेघांच्या अधरांतून
होई पृथ्वी चैतन्याची
ओल्या गंधित मातीतून

पाऊस झाला धुंदीचा 
शब्दातीत ओळखीचा 
वेडावल्या मनाच्या 
हव्या हव्या आठवणींचा.. 

Saturday, March 5, 2011

चार ओळी

सुखदसे पहाटस्वप्न
विरून जाई निमिषात 
मनी रुंजत राहती 
हातात गुंतले हात..

Tuesday, March 1, 2011

त्रिवेणी

खिडकी खोलके देखने पर चाँद दामनमें आया करता था ,
आजकल वोंह भी छूपासा रहता है,बादलोंके जंगलेमें कहीं..

शायद उसने मेरी आँखोंमे, दुनियाकी बेजानी पढ़ ली ! 
                                                  
                                                               - गौरव   

क्षण

प्रारब्धाच्या वाटा
क्षितिजाशी बोलणाऱ्या
अल्लद बोचरा काटा
गुलाबाचा फुलणाऱ्या 

   अंगणीचा मंद दिवा
   तिमिराशी झुंजणारा
   जसा चमचम काजवा
   पानांतून उजळणारा 

अशाच नि:शब्द प्रहरी
ममं मन होई रण
वेदनाचं ठेऊन ऊरी  
निसटू पाही क्षणं !   

( ध्यास 
दिवाळी अंक 2011)


Saturday, February 26, 2011

चार ओळी..

- तुझ्या आठवणींवर झुरण्याचा
  मला होता वेडा छंद, 
  तव अल्लद ओल्या स्मृतींना
  येई केवड्याचा गंध .
            
- भावबंध तुझ्याशी
 कधीच जुळून गेलेले,
 फूलं नव्या कळ्यांचे
 रात्रीत फुलून गेलेले.

-आठवण कधी थोडी थोडी
आठवण कधी येई फार
आठवणींच्या लाटांवरुनी
वाहून गेलीत वर्षे चार

Wednesday, February 23, 2011

पुन्हा.....

पुन्हा बॉम्बस्फोट..
पुन्हा तपास ,
पुन्हा आरोपी,
पुन्हा खटले,
पुन्हा तारीख,
पुन्हा मथळे,
पुन्हा काळाचा वळतो रोख,
पुन्हा गेलेल्यांसाठी क्षणिक शोक,
उद्या.......
पुन्हा बॉम्बस्फोट  ! 
               
                 (   संकल्प
                 मार्च २००९  )

Monday, February 21, 2011

पाऊस पडलेला..

तिन्हीसांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला,
वाऱ्याच्या गाण्याची संथ मधुर धून
अन आसमंत सारा केशराने भरलेला 

भरल्या आभाळी पावसाची
लागे हलकी हलकी चाहूल
अवखळश्या कृष्णमेघांची
मनास पडलेली भूल

झाडाझाडांतून नव्या चैतन्याचा सूर
 अन् सूर्यास्ताचे वेध क्षितिजाकडे
गंध मातीचा ओला पावलांशी
सांडूनी सुवासिक अत्तराचे सडे

अर्थ अक्षरजन्माचा
न सांगता कळलेला 
तिन्ही सांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला   

 -  गौरव पांडे
  (संकल्प
   फेब्रुवारी २०११ )

Saturday, February 19, 2011

शब्द

घन घन अमृतकण
शब्द ज्वाला शब्द सरण |धृ |

जन्म सारा शब्दांच्या चरणी वाहिलेला
श्वास जगण्याचा असे शब्द जाहलेला
शब्द झाले जगणे आणि शब्द मरण  |१|

न्यायास्तव होई शब्दांचे रणकंदन
दुखावल्या मनाला शब्द रक्तचंदन
दु:ख चराचराचे शब्द करी हरण  |२|

शब्द उजळी जसा तिमिरातला दीप
शब्द ओंजळीत शब्द क्षितिजासमीप  
शब्दचांदण्यातून जावे शब्दा शरण |3|

काही वेगळे..

आयुष्य जगण्याचे माझे ध्यास वेगळे होते
केलेले हे मन्मनाशी कयास वेगळे होते |

ओघळत्या स्वेदधारांची सर यावी कशाला ?
सोन्या-रुप्या  कष्टाचे घास वेगळे होते |

मरुस्थली मृगापरी जल धुंडीत होतो
ते जीवनाने फेकलेले फास वेगळे होते |

 बेईमानांनी सारी दुनिया भरली होती
प्रामाणिकास झालेले  त्रास वेगळे होते |

आजकाल जो तो रतीब टाकतो शब्दांचा
शब्द 'गौरव'चे काही खास वेगळे  होते |

- गौरव पांडे   
ध्यास
जून २००७ 

..पाहिलंय का?

कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते? 
नोटांच्या चळतीकडे धावताना 
जाणवतोय का कुणाला
पायांखाली कुस्करलेला पारिजाताचा सडा ?
या मद्यधुंद जल्लोषात
ठेवली  आहे का कुणी
एखाद्या श्रांत क्षणी दिलेल्या 
ओंजळभर पाण्याची आठवण?
रोजच्या तासा-मिनिटांच्या गणितांत 
जपलाय का कुणी ऊराशी
एखादा  अश्रूभिजला क्षण ?
रणरणत्या ऊन्हातही 
जागवलाय का कुणी मनात 
तो पहिला वेडा पाऊस ?
विचारलंय का कुणी स्वत:ला 
डोळाभरून चंद्र पाहून 
किती दिवस लोटलेत ते ?
कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते?
                     -    गौरव पांडे

सवय



आजकाल मन उदास असत फार
डोळ्यांसमोर चाललेला अनीतिचा व्यापार
रोजच्या रोज वाढत जाणारे हे कृष्णविवर...
अणि त्यातून आपले स्वत्व जपण्याची वृथा धडपड!!
आपण सारेच झालोय त्याचा भाग..
अगदी स्वत:च्याही नकळत!!
पण .. मनातल्या संवेदनाही मारत चालल्यात हळूहळू     
नव्हे ! मेल्याच आहेत त्या...
म्हणूनच , आपण रोज वाचतो , जवान शहीद झाल्याच्या ,
बॉम्बस्फोटाच्या, बालक भूकबळी गेल्याच्या बातम्या..
अगदी निर्विकारपणे...
मनातल्या मनात क्षणभर रडण्यासाठी सुद्धा
वेळ नाहीये आपल्याकडे !!
रोजची लोकल सुटता कामा नये.. बस्स..
आता जाणवतच नाहीत हातांना अनीतीचे अदृश्य ठसे..
खरच!! मरत चाललेली संवेदना..
तुमची .. माझी .. आपल्या सर्वांची !!
आणि .. आपण तर सवय करून घेतली आहे
असं मेलेलं मन घेउन जगण्याची ..
पण..का कोणास ठाऊक गेल्या कित्येक दिवसांत ...
माझ्या गुलाबाला फूलं नाही आलेलं ....
                           --
                               गौरव पांडे