Saturday, February 19, 2011

सवय



आजकाल मन उदास असत फार
डोळ्यांसमोर चाललेला अनीतिचा व्यापार
रोजच्या रोज वाढत जाणारे हे कृष्णविवर...
अणि त्यातून आपले स्वत्व जपण्याची वृथा धडपड!!
आपण सारेच झालोय त्याचा भाग..
अगदी स्वत:च्याही नकळत!!
पण .. मनातल्या संवेदनाही मारत चालल्यात हळूहळू     
नव्हे ! मेल्याच आहेत त्या...
म्हणूनच , आपण रोज वाचतो , जवान शहीद झाल्याच्या ,
बॉम्बस्फोटाच्या, बालक भूकबळी गेल्याच्या बातम्या..
अगदी निर्विकारपणे...
मनातल्या मनात क्षणभर रडण्यासाठी सुद्धा
वेळ नाहीये आपल्याकडे !!
रोजची लोकल सुटता कामा नये.. बस्स..
आता जाणवतच नाहीत हातांना अनीतीचे अदृश्य ठसे..
खरच!! मरत चाललेली संवेदना..
तुमची .. माझी .. आपल्या सर्वांची !!
आणि .. आपण तर सवय करून घेतली आहे
असं मेलेलं मन घेउन जगण्याची ..
पण..का कोणास ठाऊक गेल्या कित्येक दिवसांत ...
माझ्या गुलाबाला फूलं नाही आलेलं ....
                           --
                               गौरव पांडे

3 comments: