Saturday, May 16, 2015

जब किसी लिखने वाले की..


जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है,
थर्राते है पेड़ पौधे, रौशनी कम हो जाती है |

लिखने वाला लिखता है, बुराई से भिड़ता है,
मानवता का ध्वज लिए, रुढ़िवाद से लढता है,
जब जुर्म की गोलिया सीना पार हो जाती है,
लिखावट हर हर्फ़ की धुंदली हो जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..


‘सच्चे का बोलबाला झूठे का मुँह काला’
निडर हो के जब लिखता है लिखने वाला
आंधियां सितम की चल कर उस पर आती है,
धरती सूरज की तरफ और बढ़ जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

रुन्दती है जनता पर बांधती जुबां पे ताला है,
लिखने वाले के लिए हमेशा जहर का प्याला है,
अभिव्यक्ति जहाँ पैरोतले रौंदी जाती है,
मुरझा जाते है कागज, प्रगती खो जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

लेकिन सत्य का उद्गार न होगा कम,
शस्त्रों की वार से झुकता नहीं कलम,
निकलते है प्राण पर लफ्ज छोड़ जाती है,
बीज निर्मिती का सौ जहनो में बो जाती है
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

-    ‘गौरव’ पांडे






Sunday, May 4, 2014

फिर कभी..

अब तो निकले है हम, मिलते है, फिर कभी
उन्ही पुराने रास्तों पे, चलते है, फिर कभी |
अब न कोई सितम , फिर भी थोडा गम
यादों की खुशबू लिए, खिलते है, फिर कभी...

-गौरव

Friday, September 7, 2012

उम्मीद


हर मुश्किल राह पर उम्मीद बनाये रखिये
रात चाहे लम्बी चले, सुबह को आना ही है |

Saturday, August 18, 2012

जिंदगी



बेघर को रातभर सोने की जगह तो दे 
जिंदगी,मुझे खुलकर जीने की वजह तो दे |

 तलातुम में नन्हे परिंदे कहाँ बिखर गए ?
टूटे घर लौटने की राह तो बता दे !


ऐ जिंदगी, फूलों के चमन से सफ़र न सही ,
शोलों पे चलने का हुनर तो सिखा दे ।


                                - गौरव 

Tuesday, June 26, 2012

खोटा पाऊस

हल्लीचा पाऊसही 
रिपरिप येतो खोटे 
धुवांधार बरसणारा 
पाऊस गेला कुठे ? 

Tuesday, June 5, 2012

पसारा


दिसतात चांदण्यात 
त्या सुंदर वेळा 
कुसुम सुगंधित
शब्द-स्पर्श-सोहळा 
अजूनही वाऱ्यावर
तुझा अबोल इशारा 
तुझ्या आठवणींचा मी
आवरू कसा पसारा ?
             -  गौरव पांडे 

Saturday, March 31, 2012

ग्रेस यांस ....



कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,
तू शोधलेले साक्षात्काराचे क्षण
आमच्या हाती लागतच नाही आहेत अजून.....
इंग्रीड बर्गमनच्या आरस्पानी डोळ्यांत तुझे ऐहिक प्रेम जितके बुडून गेलयं,
तितकेच बुडलोय आम्ही पण तुझ्या रेशमाच्या शब्दसंभ्रमात...
आम्ही पुन्हा पुन्हा शोधात राहू अर्थान्वयाचे सेतू ,
तुझ्या कवितेच्या शब्दांत, नादलयीत आणि
खोल साद घालणाऱ्या ललित स्वगतांत...
आणि तू...
ख्रिस्ताचा क्रूस धरून, भौतिकाला उधळत,
संध्याकाळच्या कविता’ गात असशील
तुझ्याचं  ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात’.....  

- गौरव पांडे  
gauravpande1992@gmail.com   

Friday, February 24, 2012

निरोप


उभ्या जन्माचे चैतन्य
आज या क्षणात आहे
जरी दिसत नसले तरी 
चांदणे मनात आहे..

विरहाच्या या क्षणी 
अश्रू नकोत उदास
सुखद आठवणींनी येतील
भरून अंतरश्वास.

सहवास सुटला देठाचा 
तरी फुल अजुनी गाते 
फुलाचे अन देठाचे 
आहे सुगंधाचे नाते 
              
            -  गौरव पांडे 

Thursday, December 15, 2011

क्यों रुके ?


फासले जो बीच हमारे, अँधेरे की तरह छाये
तो खामोश खामोश चेहेरेपे रात क्यों रुके ?

तेरे कदमोंके निशाँ राहोंमे सरे बिखरेसे,
मै धुंडने चला हूँ , तो बरसात क्यों रुके ?

धन-औ-सत्ताका 'शरीफोंका' जुलूस है,
ईमान पूछूँ जरासा, तो बात क्यों रुके ? 

यह बेरहम समय तो निकल रहा 'गौरव'
आँखोंमे सुहानी यादोंकी बारात क्यों रुके ?
----------------------------------- 

Wednesday, October 19, 2011

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी,  
डोळ्यांत पाणी,
सारे काही ठरलेले,
अजून उरी जपले आहे 
तुला कधी न कळलेले..

तुझ्या माझ्या भावलहरींचा 
जरा कुठे बसता मेळ,
शब्द सारे हरवून जाती 
विरहाची ये अवचित वेळ
  मध्यरात्रीच्या दीर्घ स्वगतांत
  स्मरणाचे ऋतू सरलेले 

  तुझ्या आठवणी 
  डोळ्यांत पाणी 
  सारे काही ठरलेले...