Showing posts with label Gaurav Pande. Show all posts
Showing posts with label Gaurav Pande. Show all posts

Saturday, May 16, 2015

जब किसी लिखने वाले की..


जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है,
थर्राते है पेड़ पौधे, रौशनी कम हो जाती है |

लिखने वाला लिखता है, बुराई से भिड़ता है,
मानवता का ध्वज लिए, रुढ़िवाद से लढता है,
जब जुर्म की गोलिया सीना पार हो जाती है,
लिखावट हर हर्फ़ की धुंदली हो जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..


‘सच्चे का बोलबाला झूठे का मुँह काला’
निडर हो के जब लिखता है लिखने वाला
आंधियां सितम की चल कर उस पर आती है,
धरती सूरज की तरफ और बढ़ जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

रुन्दती है जनता पर बांधती जुबां पे ताला है,
लिखने वाले के लिए हमेशा जहर का प्याला है,
अभिव्यक्ति जहाँ पैरोतले रौंदी जाती है,
मुरझा जाते है कागज, प्रगती खो जाती है,
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

लेकिन सत्य का उद्गार न होगा कम,
शस्त्रों की वार से झुकता नहीं कलम,
निकलते है प्राण पर लफ्ज छोड़ जाती है,
बीज निर्मिती का सौ जहनो में बो जाती है
जब किसी लिखने वाले की हत्या हो जाती है..

-    ‘गौरव’ पांडे






Sunday, May 4, 2014

फिर कभी..

अब तो निकले है हम, मिलते है, फिर कभी
उन्ही पुराने रास्तों पे, चलते है, फिर कभी |
अब न कोई सितम , फिर भी थोडा गम
यादों की खुशबू लिए, खिलते है, फिर कभी...

-गौरव

Friday, September 7, 2012

उम्मीद


हर मुश्किल राह पर उम्मीद बनाये रखिये
रात चाहे लम्बी चले, सुबह को आना ही है |

Saturday, August 18, 2012

जिंदगी



बेघर को रातभर सोने की जगह तो दे 
जिंदगी,मुझे खुलकर जीने की वजह तो दे |

 तलातुम में नन्हे परिंदे कहाँ बिखर गए ?
टूटे घर लौटने की राह तो बता दे !


ऐ जिंदगी, फूलों के चमन से सफ़र न सही ,
शोलों पे चलने का हुनर तो सिखा दे ।


                                - गौरव 

Tuesday, June 5, 2012

पसारा


दिसतात चांदण्यात 
त्या सुंदर वेळा 
कुसुम सुगंधित
शब्द-स्पर्श-सोहळा 
अजूनही वाऱ्यावर
तुझा अबोल इशारा 
तुझ्या आठवणींचा मी
आवरू कसा पसारा ?
             -  गौरव पांडे 

Saturday, March 31, 2012

ग्रेस यांस ....



कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,
तू शोधलेले साक्षात्काराचे क्षण
आमच्या हाती लागतच नाही आहेत अजून.....
इंग्रीड बर्गमनच्या आरस्पानी डोळ्यांत तुझे ऐहिक प्रेम जितके बुडून गेलयं,
तितकेच बुडलोय आम्ही पण तुझ्या रेशमाच्या शब्दसंभ्रमात...
आम्ही पुन्हा पुन्हा शोधात राहू अर्थान्वयाचे सेतू ,
तुझ्या कवितेच्या शब्दांत, नादलयीत आणि
खोल साद घालणाऱ्या ललित स्वगतांत...
आणि तू...
ख्रिस्ताचा क्रूस धरून, भौतिकाला उधळत,
संध्याकाळच्या कविता’ गात असशील
तुझ्याचं  ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात’.....  

- गौरव पांडे  
gauravpande1992@gmail.com   

Friday, February 24, 2012

निरोप


उभ्या जन्माचे चैतन्य
आज या क्षणात आहे
जरी दिसत नसले तरी 
चांदणे मनात आहे..

विरहाच्या या क्षणी 
अश्रू नकोत उदास
सुखद आठवणींनी येतील
भरून अंतरश्वास.

सहवास सुटला देठाचा 
तरी फुल अजुनी गाते 
फुलाचे अन देठाचे 
आहे सुगंधाचे नाते 
              
            -  गौरव पांडे 

Thursday, December 15, 2011

क्यों रुके ?


फासले जो बीच हमारे, अँधेरे की तरह छाये
तो खामोश खामोश चेहेरेपे रात क्यों रुके ?

तेरे कदमोंके निशाँ राहोंमे सरे बिखरेसे,
मै धुंडने चला हूँ , तो बरसात क्यों रुके ?

धन-औ-सत्ताका 'शरीफोंका' जुलूस है,
ईमान पूछूँ जरासा, तो बात क्यों रुके ? 

यह बेरहम समय तो निकल रहा 'गौरव'
आँखोंमे सुहानी यादोंकी बारात क्यों रुके ?
----------------------------------- 

Wednesday, October 19, 2011

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी,  
डोळ्यांत पाणी,
सारे काही ठरलेले,
अजून उरी जपले आहे 
तुला कधी न कळलेले..

तुझ्या माझ्या भावलहरींचा 
जरा कुठे बसता मेळ,
शब्द सारे हरवून जाती 
विरहाची ये अवचित वेळ
  मध्यरात्रीच्या दीर्घ स्वगतांत
  स्मरणाचे ऋतू सरलेले 

  तुझ्या आठवणी 
  डोळ्यांत पाणी 
  सारे काही ठरलेले...

Sunday, August 21, 2011

क्रांति का आग़ाज


इक पलकी न इक दिनकी 
यह बरसोंकी बात है,
आजादिकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है |

पैसोंकी सब नशा है 
और सत्ताका  गुमान है ,
गम कहाँ,शर्म कहाँ ?
इनका बिक चुका ईमान है,
  बदलाव के अब बादल है,
  अरमानोंकी बरसात है ||
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..

सच्चाई की कीमत कहाँ ?
बेईमानीका चलता राज,
नौजवान अब जाग उठे 
परिवर्तन का हो आग़ाज ,
  खुशहाली की सहर हो रही,
  ढलनेको काली रात है ||     
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..

कठिनाईसे झुंज लेंगे 
निर्भयता का हाथ मिले,
लोकतंत्रके दहलीज पर 
नीतीमूल्योंके चराग़ जले,
  अब तो आँधी आनी है,
  पूरा भारत साथ है ||
आज़ादीकी धून नईसी
यह क्रांतिकी शुरुआत है..
                           - गौरव पांडे 

Saturday, July 16, 2011

भेट

आपलं ते अवचित भेटण
ते डोळ्यांत पाहण
जुने नवे संदर्भ शोधण
अनोळखी रस्त्यावरून चालत जाण

अनोळखी दिशा
अनोळखी वळणे 
परी तुझ्या सोबतीचा 
उघडोनी नकाशा 
दिशा झाली रोजची 
मार्ग पायांखालचा

विरहाचे दुख: सारे 
सांगून हलके झाले
वाहत्या वाऱ्यासंगे
क्षण आनंदाचे आले

उगाच आपण नंतर 
बोलत राहिलो काही
समयाचा सूर्य तिथे 
वेगे बुडून जाई

हळव्या मोहक क्षणी 
हातात गुंतले हात 
स्तब्ध सारे स्थलकाळ 
स्तब्ध चंद्र आकाशात 

जे बोललोच नाही
त्याचा अर्थ कैसा लागला  
परतीच्या वाटेवर 
प्राजक्त गंधाळला. 
               -  गौरव 

Monday, June 13, 2011

विरह



आहेत तशाच अपुल्या
जन्मोजन्मीच्या गाठी, 
ही वणवण, या वेदना 
साऱ्या तुझ्याचसाठी. 

विरहाची रात्र अटळ
संपत नाही अजुनी ,
मी शोधितो पुन्हा पुन्हा
तुलाच ग तुलाच फिरुनी !



(ही कविता ३ वर्षांपूर्वी लिहिलेली आणि गहाळ झालेली )

Sunday, May 1, 2011

इंसान और ईश्वर

इंसान सदियोंसे सर्वश्रेष्ठ प्रेरणा को ढूंढ़ता आया है ,
कोई मंदिरमें, कोई मस्जिदमें, कोई चर्चमें 
बस महसूस करते है लोग ,
किसीने देखा नहीं !
सब किसी चमत्कारितामें ढूंढते रहते है 
विधाता का अस्तित्व..
मै नादाँ सोचता रहता हूँ के, 
रास्ते के किसी कोने में बैठा एक लावारिस बच्चा,
जिसे दो दिन से खाना नसीब न हुआ हो..
अगर आप उसकी रो रो के नम हुई आँखोंमे
राम-रहीमको नहीं देख सकते तो
काशी-मक्का जानेका क्या मतलब ? 
                                              -  गौरव 

Wednesday, April 13, 2011

संभ्रम

स्वप्न सत्याच्या संघर्षात 
माझे पाऊल कुठले ?
सत्य स्वप्न,स्वप्न सत्य 
साधे गणित चुकले 

हरवून गेल्या दिशा दहा 
हरवून गेले सूर 
सत्य मिथ्या,दंश वृथा 
स्वप्न राहिले दूर 

व्यक्त-अव्यक्ताचा अर्थ निरर्थक
निरार्थाकाचाच खेळ सारा 
खिन्न मन उदास क्षण 
पश्चात उरे पसारा 

घट्ट नाती खोल वेदना 
सुखदुःखाचे अवघे विभ्रम 
विरली वाट उरले केवळ 
पाऊल...काटे...संभ्रम...

Friday, April 1, 2011

खेळ

सुखदु:खे अन हास्यअश्रू    
अव्यक्तातून शाश्वत ज्ञान,
जीवनखेळ हा अद्भुत नश्वर
नसे हारजीत नुरे अवधान
 

Friday, March 11, 2011

पाऊस

पाऊस झाला हिरवा
हिरव्यागार पानांचा
थेंबांतून उलगडे 
खेळ नव्या क्षणांचा 

पाऊस आला दाटून 
मेघांच्या अधरांतून
होई पृथ्वी चैतन्याची
ओल्या गंधित मातीतून

पाऊस झाला धुंदीचा 
शब्दातीत ओळखीचा 
वेडावल्या मनाच्या 
हव्या हव्या आठवणींचा.. 

Saturday, March 5, 2011

चार ओळी

सुखदसे पहाटस्वप्न
विरून जाई निमिषात 
मनी रुंजत राहती 
हातात गुंतले हात..

Tuesday, March 1, 2011

क्षण

प्रारब्धाच्या वाटा
क्षितिजाशी बोलणाऱ्या
अल्लद बोचरा काटा
गुलाबाचा फुलणाऱ्या 

   अंगणीचा मंद दिवा
   तिमिराशी झुंजणारा
   जसा चमचम काजवा
   पानांतून उजळणारा 

अशाच नि:शब्द प्रहरी
ममं मन होई रण
वेदनाचं ठेऊन ऊरी  
निसटू पाही क्षणं !   

( ध्यास 
दिवाळी अंक 2011)


Saturday, February 26, 2011

चार ओळी..

- तुझ्या आठवणींवर झुरण्याचा
  मला होता वेडा छंद, 
  तव अल्लद ओल्या स्मृतींना
  येई केवड्याचा गंध .
            
- भावबंध तुझ्याशी
 कधीच जुळून गेलेले,
 फूलं नव्या कळ्यांचे
 रात्रीत फुलून गेलेले.

-आठवण कधी थोडी थोडी
आठवण कधी येई फार
आठवणींच्या लाटांवरुनी
वाहून गेलीत वर्षे चार

Wednesday, February 23, 2011

पुन्हा.....

पुन्हा बॉम्बस्फोट..
पुन्हा तपास ,
पुन्हा आरोपी,
पुन्हा खटले,
पुन्हा तारीख,
पुन्हा मथळे,
पुन्हा काळाचा वळतो रोख,
पुन्हा गेलेल्यांसाठी क्षणिक शोक,
उद्या.......
पुन्हा बॉम्बस्फोट  ! 
               
                 (   संकल्प
                 मार्च २००९  )